मुख्य सामग्रीवर वगळा

इतिहास :पोळा मारबत, नागपूर

 नागपुरातील मारबतीचा इतिहास 
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना चिडविण्यासाठी मारबत काढण्याची प्रथा सुरू झाली. प्रामुख्याने मस्कासाथ, इतवारी तसेच जागनाथ बुधवारी या
 ठिकाणाहून काळी आणि पिवळी अशा दोन मारबती निघतात. या दोन्ही मारबती नेहरू पुतळा चौकात एकत्र येतात. मारबतींमधील बडग्या हा
विशेष चर्चेचा विषय असतो. ज्या गोष्टींचा निषेध करायचा आहे,त्याचा बडग्या या मारबतींसोबत असतो.
निषेध करण्यासाठी  'घेऊन जा गे मारबत' हा नारा दिला जातो. पुढे मारबतींसोबतच सर्व बडग्यांचे  नाईक तलाव येथे दहन केले जाते.
'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली
त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक
काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.बाकांबाईच्या नवर्‍यानेपण या तिच्या कृत्याचा
विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला 'बडग्या' म्हणतात.
या दिवशी(श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी) नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात.
मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात.ही एक प्रकारे जत्राच आहे. तेथे अनेक फेरीवाले फुगे,खेळणी इ.वस्तु विकतात.
या वेळेस पावसाळयाच्या जोर कमी झाला असतो.शेतीची कामेपण बहुधा झालेली असतात.त्यामुळे शेतकऱ्यांना व इतरेजनांना हा एक विरंगुळा वाटतो.
ईंग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परीसरातील नागरीकांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे
झालेली जखम अजुन भळभळतेच आहे.


सन २०१९ मध्ये काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला १४० वर्षे तर पिवळ्या मारबतीला १३६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
Attachments area

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बस्तरची सफर

  ' बस्तर ची सफर' बरेच दिवसांपासून बस्तर, छत्तीसगढ़ येथे जाण्याचे मनात होते, त्यामागील कारणही तसेच होते. मी नुकताच इयत्ता ४ ची उत्तिर्ण झालो होतो. माझ्या आजोबा जगदलपूर येथे नोकरीला होते. जगदलपूर त्यावेळी मध्यप्रदेशात येत होते, आता ते छत्तीसगड मध्ये येते. आजोबा मला जगदलपूर ला सोबत घेऊन गेले. तिथेच त्यांनी माझा दाखला ५ व्या इयत्तेत केला. त्यामुळे ५ वी चे शालेय शिक्षण जगदलपूर येथे झाले. नंतर मी माझ्या गावी लोधीखेड्याला परत आलो. त्यावेळ पासून मला जगदलपूर आणि आजुबाजूच्या परिसर मला खूपच आवडला होता. बरे असो ! मागच्या महिन्यात  एक ट्रॅव्हल कंपनीची बस्तर टूर करिता जाहिरात बघितली आणि त्यांचे सोबत जाण्याचे नक्की केले.  बस्तर पावसाळ्यात बघण्याची मजा काही औरच असते. पावसाळी दिवस असल्याने सर्वांनी सोबत रेनकोट,छत्री आणि कॅप जवळ बाळगण्यास सांगितले होते. सगळी तयारी करता करता जाण्याचा दिवस येऊन ठेपला. वंदेभारत ट्रेन जायचे असल्यामुळे सोबत डबा वैगेरे घेऊन जाण्याची गरज नव्हती कारण ट्रेन मध्ये जेवण आणि चहा मिळतो. ११ जुलैला दुपारी २ वाजता वंदेभारत एक्सप्रेस ने जायचे होते. आम्ही सर्व प्लॅटफॉर्म क...

मोबाइल चा कैदी

पूर्वी लोक सकाळी उठल्यावर देवाचे दर्शन घ्यायचे. आता मात्र डोळे उघडताच सर्वप्रथम मोबाईलचे दर्शन घेतले जाते. देवाला नमस्कार नंतर, पण मोबाईलची बॅटरी किती आहे हे आधी पाहिले जाते! जणू काही मोबाईल हा घरातील सर्वात लाडका सदस्य झाला आहे. आजकाल मोबाईल हरवला तर माणूस एवढा घाबरतो की जणू त्याची अर्धी दुनिया हरवली आहे. पण घरातल्या चाव्या, चष्मा किंवा पाकीट हरवले तर तो शांतपणे शोधत बसतो. मोबाईल सापडेपर्यंत मात्र चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे असतात. "अरे, कुणी माझा मोबाईल पाहिलाय का?" हा प्रश्न दिवसातून किमान तीन वेळा तरी घरात ऐकू येतो. जेवताना देखील आता थाळीपेक्षा मोबाईलकडेच जास्त लक्ष असते. एका हातात पोळी आणि दुसऱ्या हातात मोबाईल. मध्येच एखादा व्हिडिओ इतका मजेशीर लागतो की घास तोंडातच थांबतो. आई म्हणते, "जेवण कर!" आणि मुलगा म्हणतो, "हो... हा शेवटचा रील!" पण तो "शेवटचा रील" कधीच संपत नाही. मोबाईलमुळे आणखी एक मजेशीर प्रकार सुरू झाला आहे. पूर्वी लोक भेटले की विचारायचे, "कसे आहात?" आता मात्र विचारतात, "Wi-Fi चा पासवर्ड काय आहे?" काही पाहुणे त...