Skip to main content

इतिहास :पोळा मारबत, नागपूर

 नागपुरातील मारबतीचा इतिहास 
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना चिडविण्यासाठी मारबत काढण्याची प्रथा सुरू झाली. प्रामुख्याने मस्कासाथ, इतवारी तसेच जागनाथ बुधवारी या
 ठिकाणाहून काळी आणि पिवळी अशा दोन मारबती निघतात. या दोन्ही मारबती नेहरू पुतळा चौकात एकत्र येतात. मारबतींमधील बडग्या हा
विशेष चर्चेचा विषय असतो. ज्या गोष्टींचा निषेध करायचा आहे,त्याचा बडग्या या मारबतींसोबत असतो.
निषेध करण्यासाठी  'घेऊन जा गे मारबत' हा नारा दिला जातो. पुढे मारबतींसोबतच सर्व बडग्यांचे  नाईक तलाव येथे दहन केले जाते.
'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली
त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक
काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.बाकांबाईच्या नवर्‍यानेपण या तिच्या कृत्याचा
विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला 'बडग्या' म्हणतात.
या दिवशी(श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी) नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात.
मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात.ही एक प्रकारे जत्राच आहे. तेथे अनेक फेरीवाले फुगे,खेळणी इ.वस्तु विकतात.
या वेळेस पावसाळयाच्या जोर कमी झाला असतो.शेतीची कामेपण बहुधा झालेली असतात.त्यामुळे शेतकऱ्यांना व इतरेजनांना हा एक विरंगुळा वाटतो.
ईंग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परीसरातील नागरीकांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे
झालेली जखम अजुन भळभळतेच आहे.


सन २०१९ मध्ये काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला १४० वर्षे तर पिवळ्या मारबतीला १३६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
Attachments area

Comments

Popular posts from this blog

हर फिक्र को धुंए में उड़ाता चला गया

जवळपास रात्रीचे ८ वाजले असतील, मी आणि अक्षय कांही खरेदी करण्यासाठी सिताबर्डी वर गेलो होतो. रिजंट टॉकीजचे जवळ एक पानठेला आ हे. मी कधी पानठेल्यावर जाऊन पान किंवा तत्सम मुखशुद्धी करणारे पदार्थ खायला फारसा जात नाही. पण या वयाचे ७७ वर्ष पूर्ण झालेल्या पानठेले वाल्याकडे माझे लक्ष नकळत गेले. मी उत्सुकतेने त्या ठेल्याकडे गेलो. त्याचा हसतमुख चेहरा बघून खूप छान वाटले. थोडावेळ गप्पाटप्पा झाल्या. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की जवळपास ५० वर्षांपासून याच पानठेल्यावर ते काम करत आहेत. पानठेला त्यांचा स्वत:चा आहे. मध्येच त्यांनी एका गाण्याची तान छेडली " मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुंए में उड़ाता चला गया" . मी विचार करु लागलो की त्यांच्या गाण्यात किती सत्यता होती. आणि म्हणूनच ते अविरत ५० वर्षांपासून आनंदाने आपले काम करत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे, आनंदी रहायला पाहिजे. या थोड्या वेळाच्या भेटीमध्ये तो पानठेलेवाला मला जिवन जगण्याचं तत्वज्ञान शिकवून गेला.