जीवनात प्रत्येक माणसाच्या वाट्याला संकटे येतात. कोणाला आर्थिक अडचणी असतात, कोणाला आरोग्याच्या समस्या, तर कोणाला नातेसंबंधातील तणावाचा सामना करावा लागतो. अनेकदा संकट समोर आले की माणूस खचून जातो. "आता सर्व काही संपले," अशी भावना मनात निर्माण होते. पण खरं पाहिलं तर संकट म्हणजे शेवट नसतो; ती नव्या सुरुवातीची संधी असते. इतिहासात अनेक महान व्यक्तींनी अपयश आणि संकटांचा सामना करूनच यश मिळवले आहे. जर त्यांनी पहिल्याच अडचणीसमोर हार मानली असती, तर आज जग त्यांना ओळखलेही नसते. त्यामुळे संकटांकडे शत्रू म्हणून नव्हे, तर शिक्षक म्हणून पाहिले पाहिजे. प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. वादळ आले की मोठमोठी झाडेही डोलतात, पण त्यांची मुळे मजबूत असतील तर ती पुन्हा ताठ उभी राहतात. त्याचप्रमाणे आपला आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक विचार मजबूत असतील तर कोणतेही संकट आपल्याला कायमचे हरवू शकत नाही. कठीण प्रसंग आपल्या सहनशक्तीची आणि जिद्दीची परीक्षा घेतात. संकटाच्या काळात घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असते. प्रत्येक समस्येचे उत्तर असते, फक्त ते शोधण्या...
आज रविवार ..सुटीचा दिवस असल्यामुळे कुठे तरी बाहेर फिरून येण्याचा बेत ठरला,तसा ४-५ दिवसांपासून पाऊस देखील पडेनासा झाला असल्याने नागार्जुन देवस्थान, अंबाळा, रामटेक गडमंदीर आणि नगरधन किल्ला बघून यावे असे ठरले. सकाळी ७.३० वाजता आम्ही घरून निघालो. ९.३० ला मनसर ला पोहचलो,तिथे गरमागरम चहा घेऊन नागार्जुन मार्गे पुढचा प्रवास सुरु झाला. अर्ध्या तासात नागार्जुन देवस्थान ला पोहचलो. देवस्थान बरेच उंचावर असल्याकारणाने तिथे दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या जवळपास ३५० असून सर्व उभ्या धाटणीच्या आहेत, त्यामुळे चढतांना बरीच दमछाक होते. चढतांना दोहो बाजूला मस्त हिरवीगार झाडे आहेत. जसं जसं आपणं वर चढत जातो तसा वारा देखील वाहत असतो, त्यामुळे आलेला थकवा आणि घाम क्षणात विरून जातो,परत नव्याने चढण्यासाठी स्फूर्ती येते. अर्ध्या पायऱ्या चढल्यावर दुरून मंदिराचे दर्शन होते. तेव्हा पाऊले आपसूकच उत्साहाने पुढे पडत असतात. चढतांना आपण किती पायऱ्या चढलो यांचे भान राहत नाही परंतु उतरतांना आठवणीने पायऱ्या मोजल्या. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत देवस्थानच्या परिसरात पोहचलो. आजूबाजूचा परिसर हिरव्यागार झाडांनी व्यापलेला आह...