एका ट्रीपची गोष्ट.. त्यावेळी मी राजस्थान येथील चित्तोडगढ येथे नोकरीला होतो. जवळपास तीन वर्षा पूर्वीची गोष्ट आहे ही, मी आणि माझ्या मित्राने (संजय व संगिता राजावत) सहकुटुंब एका रविवारी येथील प्रसिद्ध श्री नाथद्वार देवस्थाना जवळ असणाऱ्या वॉटर फॉल ला ट्रिप म्हणून एका रविवारी जाण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे आम्ही दोन्ही परिवार सकाळी लवकर उठून जय्यत तयारीने मित्राच्या कारने निघालो. बरेच दिवसात घराच्या बाहेर निघालो असल्याने मस्त आनंद लुटत प्रवास सुरू होता. नाथद्वार देवालयाचे दर्शन परत येताना घेऊ असे ठरले.वॉटरफॉल ला ११वाजता पोहचलो. वॉटरफॉलचा नजारा अप्रतिम होता. वॉटरफॉल मध्ये जावून आंघोळीसाठी जाण्यासाठी सगळी तयारी अर्थात कपडे वगैरे घेऊन व गाडी लॉक करून वॉटर फॉल च्या खाली पोहोचलो. तिथे दोन तास थंड गार पाण्याचा आनंद घेतला. तिथून बाहेर पडूच नये असे वाटत होते. शेवटी अंगावरील ओलं चिंब कपड्यांनी गाडी जवळ पोहचलो. मित्राने गाडी उघडण्या करिता जसा पायजमा च्या खिशात हात टाकला तर त्याच्या लक्षात आले की कारची चावी वॉटर फॉल मध्ये पडली होती. लगेच आम्ही दोघे पुन्हा तिथे जाऊन खूप शोधाशोध के
आनंद सहल आज रविवार ..सुटीचा दिवस असल्यामुळे कुठे तरी बाहेर फिरून येण्याचा बेत ठरला,तसा ४-५ दिवसांपासून पाऊस देखील पडेनासा झाला असल्याने नागार्जुन देवस्थान, अंबाळा, रामटेक गडमंदीर आणि नगरधन किल्ला बघून यावे असे ठरले. सकाळी ७.३० वाजता आम्ही घरून निघालो. ९.३० ला मनसर ला पोहचलो,तिथे गरमागरम चहा घेऊन नागार्जुन मार्गे पुढचा प्रवास सुरु झाला. अर्ध्या तासात नागार्जुन देवस्थान ला पोहचलो. देवस्थान बरेच उंचावर असल्याकारणाने तिथे दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या जवळपास ३५० असून सर्व उभ्या धाटणीच्या आहेत, त्यामुळे चढतांना बरीच दमछाक होते. चढतांना दोहो बाजूला मस्त हिरवीगार झाडे आहेत. जसं जसं आपणं वर चढत जातो तसा वारा देखील वाहत असतो, त्यामुळे आलेला थकवा आणि घाम क्षणात विरून जातो,परत नव्याने चढण्यासाठी स्फूर्ती येते. अर्ध्या पायऱ्या चढल्यावर दुरून मंदिराचे दर्शन होते. तेव्हा पाऊले आपसूकच उत्साहाने पुढे पडत असतात. चढतांना आपण किती पायऱ्या चढलो यांचे भान राहत नाही परंतु उतरतांना आठवणीने पायऱ्या मोजल्या. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत देवस्थानच्या परिसरात पोहचलो. आजूबाजूचा परिसर हिरव्यागार झाडांनी व्या